विकास पासलकर यांच्या प्रवेशामुळे पक्षाला पुरोगामी विचारांचा कार्यकर्ता मिळाला


पुणे | (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
यशवंतराव चव्हाण यांनी ज्या प्रमाणे सुसंस्कृत राजकारण केले, विरोधकांचा सन्मान ठेवला. खालच्या स्तरावर जाऊन टीका कधी केली नाही. हेच पथ्य आता पाळावे लागणार आहे. धर्माच्या नावाने होणारे राजकारण यापुढे जास्त काळ चालणार नाही.
विचारधारा आणि अठरापगड जातींना बरोबर घेतल्यानंतर यापुढे राजकारण करता येणार आहे, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले, की सन १९८७ पासून राजकारणाला प्रारंभ केल्यानंतर अनेक माणसे जोडली. काही माणसे शरद पवार यांच्या विचारधारेमुळे जोडली गेली. विविध संस्थांमध्ये काम करताना आपल्या विचारांची माणसे कशी टिकतील, यासाठी सातत्याने प्रयत्न केला. राजकारणात अनेक चढ-उतार आले. मात्र जिल्ह्याने सातत्याने प्रेम केले. त्यामुळेच राज्याचे प्रश्न सोडविताना पुणे जिल्हाही सर्व क्षेत्रात अग्रेसर राहवा, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
विकास पासलकर यांच्या प्रवेशामुळे पक्षाला पुरोगामी विचारांचा कार्यकर्ता मिळाला आहे. त्यामुळे पासलकर यांच्याकडे प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रवक्ता हे महत्त्वाचे पद आहे. प्रवक्त्यांना प्रश्नांना कसे उत्तर द्यावे, पक्षाची भूमिका कशी मांडावी, आणि कोणताही समाज दुखावला जाणार नाही याची दक्षता घ्यावी लागते.
पासलकर ही भूमिका जबाबदारीने पार पाडतील, असा विश्वास राज्यात जाती-धर्मामध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची वस्तुस्थिती असून अशा प्रकारे धर्मावर आधारित राजकारण फार काळ टिकणार नाही, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी विकास पासलकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) शुक्रवारी जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमात ते बोलत होते.