दलितांना हत्यार वापरण्याचं लायसन्स द्या- भीम आर्मी


नवी दिल्ली: भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी हाथरस अत्याचार प्रकरणावरुन योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी आरोप केला आहे की, मुख्यमंत्री जातियवादी आहेत. त्यामुळंच न्याय होत नाहीय. पीडितांनाच मारलं जात आहे, असं ते म्हणाले. त्यांनी दलितांना हत्यार वापरण्याचं लायसन्स द्या, अशी मागणी देखील केली आहे. चंद्रशेखर आझाद म्हणाले की, पुराव्यांशी छेडछाड करणं गुन्हा आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी असं केलं गेलं आहे. मी माझ्या आईला वचन दिलंय की जोवर न्याय होत नाही तोवर मी घरी जाणार नाही.
त्यांनी मागणी केली की, दलितांना वीस लाख हत्यार दिली जावी ज्यांना लायसन्स असेल. लाखो लोकांजवळ लायसन्स आहेत. त्यांनी वाल्मिकी समाजाला आवाहन केलं की जोवर न्याय मिळत नाही तोवर साफसफाई करु नका, कामावर जाऊ नका. हाथरस प्रकरणाच्या निषेधार्थ शुक्रवारी दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन करण्यात आलं. त्या आंदोलनात चंद्रशेखर आझाद सहभागी झाले होते.