आपआपसात मतभेद ठेवू नका- शरद पवार

अहमदनगर:अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील शेंडी गावात  माजी आमदार कै.स्व.यशवंतराव भांगरे यांच्या पुतळ्याचे अनावर शरद पवार यांच्या हस्ते पार पडले.  तसंच शरद पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून चौफेर टोलेबाजी करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.’स्व.यशवंतराव भांगरे यांनी अकोले तालुक्यासाठी मोठे काम केले आहे.  तालुक्याच्या विकासासाठी सगळे एकत्र आले. ‘जशी एकजूट विधानसभेला ठेवली तशीच कायम ठेवा. आपआपसात मतभेद ठेवू नका’, असा सल्ला शरद पवार यांनी सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना दिला.’पक्षात आलेल्या सर्वांना भरभरून दिले होते. काही जणांना राज्याचे नेतृत्व दिले, पक्षाची धुरा दिली पण तरीही ते पक्षाला सोडून गेले. अनेकजण सोडून गेले मात्र काही फरक पडत नाही. जनतेने निवडणूक हातात घेतली आणि त्यांचा पराभव झाला’, असं म्हणत शरद पवार यांनी मधुकर पिचड यांच्यावर टीका केली.’पवनचक्कीसाठी ज्यांनी आपल्या जमिनी दिल्या त्यांना कंपनी मदत करत नाही ही खंत आहे.  इथल्या साखर कारखान्याने एवढे मोठे कर्ज वाढवून ठेवले आहे.  कारखान्याचे अस्तित्व टिकवायचे असेल तर झारीतले शुक्राचार्य बाजूला काढावा लागेल