माझ्या जीवितास काही झालं तर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि मराठा संघटना जबाबदार असतील- अँड गुणरत्न सदावर्ते

PicsArt_05-05-06.53.52
मुख्यमंत्र्यांना वेठीस धरून आरक्षण मिळत नसतं तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनुसार आरक्षण मिळतं,

मुंबई | मराठा आरक्षण चानिकाल आल्यापासून मला जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. अश्लिल शिवीगाळ केली जात आहे, असं याचिकाकर्त्या जयश्री पाटील म्हणाल्या आहेत. तसेच माझ्या जीवितास काही झालं तर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि मराठा संघटना जबाबदार असतील. आम्हाला जे जे धमक्या देतायेत तेच जबाबदार असतील, असं गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं आहे.आरक्षणासाठी असं घाणेरडं राजकारण केलं गेलं. मुघलाईपद्धतीने आरक्षण दिलं जाऊ शकत नाही हे सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केलं आहे. कोणत्याही पद्धतीने 50 टक्के मर्यादा ओलांडली जाऊ शकत नाही हे घटनेत लिहिलं आहे. इंदिरा सहानी खटल्याला पुन्हा विचारात घेण्याची गरज नाही. अशोक चव्हाण तुम्ही जातीचे मंत्री नाही तर राज्याचे मंत्री आहे. हे राज्य पाटिलकी, देशमुख यांचे राज्य नाही. डंके की चोट पर न्यायालयाने निकाल दिला आहे, असं अँड गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत.मराठा आजही प्रभावशाली आहे. मागासवर्गीयांना जळताना लाकडं दिली जात नाही. अशा अत्याचारी लोकांना आरक्षण कसं दिलं जाऊ शकतं? मोर्चे काढून, मुख्यमंत्र्यांना वेठीस धरून आरक्षण मिळत नसतं तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनुसार आरक्षण मिळतं, असा टोलाही गुणरत्न सदावर्ते यांनी लगावला आहे.मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयानं अंतिम निकाल सुनावत आरक्षण रद्द केलं आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून याचा निषेध करण्यात येत आहे. आता मराठा आरक्षणाला विरोध करणारे अँड जयश्री पाटील आणि गुणरत्न सदावर्ते यांनी आम्हाला धमक्या येत असून आमच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलंय.

Latest News