विधानसभेच्या भाजपाचे बारा आमदाराचे निलंबन : भास्कराव जाधव विधानसभा अध्यक्ष

मुंबई :भास्कर जाधव आणि संजय कुटे यांच्यातील बाचाबाचीनंतर विधानसभेत गोधळ व शिवीगाळ करणारे बारा आमदाराच्या निलंबन करणाच्या प्रस्ताव महाविकास आघाडीच्या वतीने ठेवण्यात आला त्यावर तात्काळ हंगामी अध्यक्ष भास्कराव जाधव यांनी निलंबन अवाजवी मतांनी मंजूर केले

भाजपच्या विधानसभेतील 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं. यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना ओबीसी आरक्षणासाठी बाराच काय, 106 आमदारांचं निलंबन केलं तरी मागे हटणार नाही अशा शब्दांत राज्य सरकारवर निशाणा साधला

चेंबरमध्ये शिवी देणारे कोण होते हे सर्वांनी बघितले आहे. तिथे शिवसेनेच्या सदस्यांनी येऊन धक्काबुक्की केली, त्यानंतर बाचाबाची झाली. यानंतर आशिष शेलारांनी सर्वांच्या वतीने भास्कर जाधव यांची माफी मागितली आणि विषय संपवून आम्ही बाहेर आलो. मात्र त्यानंतर सरकारच्या मंत्र्यांनी आमचे आमदार सस्पेंड करण्यासाठी ही स्टोरी तयार केल्याचा आरोप फडणवीसांनी केला.

 

. यापूर्वी अनेकदा सभागृहात बाचाबाची झाली, मात्र कुणाचेही निलंबन झाले नाही असेही ते म्हणाले.ओबीसी आरक्षणासाठी 106 आमदारांचं निलंबन केलं तरी मागे हटणार नाही -देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावर हे सरकार फेल ठरले आहे अशी टीका फडणवीस यांनी केली

. मराठा समाजाला फसविण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. मराठा आरक्षणावर राज्य सरकारचा ठराव म्हणजे, लग्न झालं नाही, मात्र पोराचं नाव ठरवून पाठविण्याचा प्रकार असल्याची टीका फडणवीस यांनी केली.