मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री, कुठलं पद काही ठेवलं नाही- विरोधी पक्षनेते अजित पवार

मुंबई :. नशीबवान आमदार म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. कारण अजून अडीच वर्ष झाली. अजून पुढील अडीच वर्षांचा कार्यकाळ बाकी आहे. या काळात फडणवीस हे मुख्यमंत्री झाले, विरोधी पक्षनेते झाले आणि आता उपमुख्यमंत्री झाले आहे, कुठलं पद काही ठेवलं नाही. सगळी पदंही भुषवली आहे, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील असा कुणीच विचार केला नव्हता. फडणवीस हे सारखे शिवसैनिक शिवसैनिक म्हणून एकनाथ शिंदे यांचा उल्लेख करत आहे. हे सांगण्याची वेळ का येत आहे.शिवसैनिक आहे तर सारखं का सांगत आहात. याचा कुठे तरी विचार झाला पाहिजे. शिंदे आणि फडणवीस यांनी 30 तारखेला शपथ घेतली. तुम्हाला राज्यपालांनी 4 तारखेला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते.तुम्ही तो बहुमत सिद्ध केला आहे. ‘सत्ता येते आणि सत्ता जाते, कुणी ताम्रपट घेऊन जन्माला घेऊन आलेलं नाही

. एकनाथ शिंदे यांचं इतकं कौतुक करत होता. त्यांना फडणवीस सरकारच्या काळात फक्त एकच मंत्रिपद दिलं होतं.तुम्ही त्यावेळी त्यांना रस्ते आणि महाविकास महामंडळ हे खाते दिले होते. जनतेशी संबंधित एकही खाते दिले नव्हते. एवढं शिंदेंचं कौतुक करताय तर त्यावेळी मंत्रिपद का दिली नाही. खरं तर हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, 11 तारखेला सुप्रीम कोर्ट निकाल देणार आहे.पण, त्याआधी तुम्ही बहुमताची चाचणी घेतली

. शिवसेनेचे आमदार फुटले, आज 40 आमदार झाले आहे. या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अविश्वास दाखवून बाहेर पडले. त्यामुळे उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला.त्याचे परिणाम तुम्हाला काय दिसतील हे मतदारसंघात पाहण्यास मिळतील. बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेना उभा केली

. ज्या ज्या वेळी बाळासाहेबांची शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला, भुजबळांनी 18-19 आमदार घेऊन शिवसेना फोडली त्यानंतर निवडणुकीमध्ये एकही आमदार निवडून आला नाही. नारायण राणेही बाहेर पडले होते. त्यावेळीही आमदार निवडून आले याचा आत्मचिंतन आणि आत्मपरिक्षण करावे लागेल

. शिंदे सरकारने बहुमत जिंकल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला. यावेळी बोलत असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फडणवीस यांच्या भाषणाचा समाचार घेत जोरदार टोलेबाजी केली. देवेंद्र फडणवीस यांना मी बऱ्याच वर्षांपासून फडणवीस यांना भाषण करताना पाहिले. मुख्यमंत्री असताना पाहिले,विरोधी पक्षनेते असतानाही पाहिले पण आज तो जोश आणि ते तेज चेहऱ्यावर दिसत नव्हते. तुम्ही वकिलाच्या पेशाने कसं हे सरकार योग्य आहे, त्यांनी चांगले काम केले आहे हे तुम्ही पटवून दिले, असा टोला अजितदादांनी फडणवीसांना लगावला

. तसंच, सगळ्या आमदारांमध्ये नशीबवान आमदार म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. कारण अजून अडीच वर्ष झाली. अजून पुढील अडीच वर्षांचा कार्यकाळ बाकी आहे. या काळात फडणवीस हे मुख्यमंत्री झाले, विरोधी पक्षनेते झाले आणि आता उपमुख्यमंत्री झाले आहे, कुठलं पद काही ठेवलं नाही.सगळी पदंही भुषवली आहे, असा टोलाही अजितदादांनी लगावला.

Latest News