महापालिकेची निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना

राज्य निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी राज्यातील नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर केल्या. पण या निवडणुका पुढे ढकलण्याबाबत चर्चा करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सागितलं आहेओबीसी आरक्षणासंदर्भातील प्रकरण सध्या कोर्टात आहे. यावर निर्णय येणे बाकी आहे पण आरक्षणावर निर्णय झाल्यावर निवडणुका घ्याव्यात अशी आमची पहिल्यापासून इच्छा आहे. सगळी कडे पाऊस आहे, बऱ्याच ठिकाणी पूर येत आहे आणि अशा परिस्थितीत निवडणुकीसाठी यंत्रणा तयार करणे अवघड आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाला बोलणार आहोत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

. सध्या पावसाळा आहे, अडचणी निर्माण होऊ शकतात, पावसाळ्यात मनुष्यबळही जास्त लागेल त्यासाठी या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात यावर आयोगाशी चर्चा करणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. या दौऱ्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाजी आणि केंद्रीय मंत्री राजनाथसिंग यांच्या भेटी घेतल्या,

यानंतर माध्यमांशी संवाद साधला, यादरम्यान मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबद्दल विचारले असता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ही भेट सदिच्छा भेट आहे. आम्ही दोघं उद्या आषाढी एकादशी झाली की मुंबईत बसून चर्चा करू आणि तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर देऊ असे त्यांनी सांगितलं. अधिवेशन हे पुढे ढकलले जाणार का यावर बोलतांना शिंदे यांनी सांगितले की, १८ तारखेला राष्ट्रपतीपदाची निवडणूक असल्याने ते मागे-पुढे होऊ शकते. पण या अधिवेशनाच्या पुर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल असे एकनाथ शिंदे

Latest News