फॉक्सकॉन कंपनीचा 1. 54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातमध्ये सरकार झोपले. होते का?:- आदित्य ठाकरे

मुंबई (. -ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)-

तळेगाव (पुणे) येथे हा प्रकल्प उभारण्याचे ठरवले होते दावोसमध्येही आमची चर्चा महाराष्ट्रात हा उद्योग येईल, अशाच पद्धतीने झाली होती. हा प्रकल्प पावणे दोन लाख कोटींचा आहे. या प्रकल्पाबरोबरच १६० छोट्या-मोठ्या कंपन्या येणार होत्या. हे सगळे होत असताना सकाळी गुजरात सोबत करार झाला,.: महाराष्ट्रात येऊ घातलेला फॉक्सकॉन कंपनीचा 1. 54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे. हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार असे ९० टक्के ठकले होते. मात्र, मागली एका महिन्यात असे काय घडले की हा प्रकल्प गुजरातला गेला, असा सवाल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला.

माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. सेमीकंडक्टर निमिर्ती प्रोजेक्ट महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारडून तैवानमधील कंपनीसोबतची चर्चा अंतिम टप्प्यात होती, असे देसाई यांनी सांगितले. आदित्य म्हणाले, सुभाष देसाईजी आणि माझी वेदांता व फॉक्सकॉन यांच्याशी चर्चा झाली होती. आमच्या भेटीही झाल्या होत्या. त्या कंपन्यांच्या शिष्टमंडळाने ठिकाणांना भेटी दिल्या होत्या.

महाराष्ट्रात सरकार आहे की नाही, असा प्रश्न पडला आहे, राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, कुठे गोळीबार होतो. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकार काम करत होतो. तेव्हा राज्यात आम्ही साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक आणली

. ९० टक्क्यांहून अधिक सामजंस्य करार झालेले आहे. त्यांना जागा उपलब्ध करुन दिली आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास महाविकास आघाडी सरकारवर होता, असेही आदित्य यांनी सांगितले.दावोस दौऱ्यात आम्ही ८० हजार कोटींची गुंतवणूक आणली होती. आता राज्यात गुंतवणुकीला पोषक वातावरण नाही, असा आरोप आदित्य यांनी केला.

राज्यातील सरकारवर कुणाचाही विश्वास नाही. आज धक्कादायक प्रकार घडला. राज्यात येणारी कंपनी शेवटच्या मिनिटाला का निघून गेली. या बेकायदेशीर सरकारमधील खऱ्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगावे. ही गुंतवणूक आपल्या राज्यातून का गेली, असा तिखट सवाल आदित्य यांनी केला.

हा प्रकल्प उद्योग मंत्र्यांनी व स्थानिक प्रशासनाने मेहनत घेतल्याचे म्हटले. मग आपले उद्योगमंत्री आपले खोके सरकार काय करत होते. प्रशासन काय करत होते. जी कंपनी महाराष्ट्रात जूनपर्यंत येणार होती. त्यानंतर २६ जुलैला मुख्यमंत्र्यांच्या ट्विटरवर ट्विट आहे की, ही कंपनी इथेच येणार मग महिनाभरात असे काय घडले, असा सवाल आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला केला आहे.

Latest News