ओसमध्ये महाराष्ट्रला 45 हजार 900 कोटी रुपयांची गुंतवणूक

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात आले. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. सुमारे 10 हजार तरुणांच्या हाताला काम मिळणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली

. दाओस (Davos) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आगमन झाले आहे. त्यांनी दाओस येथे सज्ज असलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट दिल्याचे सामंत यांनी सांगितले.

महाराष्ट्र (Maharashtra) पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या प्रगतीचे प्रभावी दर्शन घडवले जाणार आहे. तसेच महत्वाच्या उद्योगांसमवेत सामंजस्य करारही केले जाणार जाणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्याला (Maharashtra) 45 हजार 900 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली आहे.यामुळं सुमारे 10 हजार लोकांना प्रत्यक्षपणे रोजगार मिळणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी दिली. स्वित्झर्लंड येथील दाओसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या या कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, टी. कृष्णा, श्रे एरेन, आशीष नवडे, स्टीफन व सर्व संबंधित उपस्थित होते. आजपासून दावोस परिषदेला सुरूवात झाली. जगभरातल्या देशांसाठी आणि उद्योगपतींसाठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (World Economic Forum) महत्त्वाची मानली जाते. या परिषदेत विविध कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात येतात. तसेच राज्यातील देशातील गुंतवणुकीच्या संदर्बात चर्चा होते.

दाओसमध्ये कोणत्या कंपन्यांसोबत करण्यात आले सामंजस्य करार

1) Greenko Energy Projects Pvt.Ltd 12 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
2) Berkshire Hathaway Home Services Orenda India 16 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
3)ICP Investments/ Indus Capital 16 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
4) Rukhi Foods 480 कोटी रुपयांची गुंतवणूक
5)Nipro Pharma Packaging India Pvt. Ltd. 1 हजार 650 कोटी रुपयांची गुंतवणूक

Latest News