कवितेस कारण की..’ कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद !-_”एखादी जखम पुरेशी असते , कवितेसाठी__कविता नसते, नुसती शब्दांची दाटी


‘कवितेस कारण की..’ कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद !-_”एखादी जखम पुरेशी असते , कवितेसाठी__कविता नसते, नुसती शब्दांची दाटी
भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन
पुणे ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित ,’आरपार’ प्रस्तुत ‘कवितेस कारण की..’ या कार्यक्रमाला तरुणाईचा भरभरून प्रतिसाद मिळाला !
रविवार , ३० एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम झाला.या कार्यक्रमात जयेश पवार,नैनेश तांबे,भैरवी चितळे,सारंग पांपटवार,अपूर्व राजपूत यांनी कवितांचे, गझलांचे प्रभावी सादरीकरण केले. कवितांच्या या सादरीकरणाला रसिकांनी मोठी गर्दी केली होती.
_”एखादी जखम पुरेशी असते , कवितेसाठी__कविता नसते, नुसती शब्दांची दाटी “_असे सांगत कविता,गजल, गप्पांची ही बहारदार मैफल उत्तरोत्तर रंगत गेली_”
आज ऐकायला फक्त आहेस तू,__गोष्ट ऐकायला फक्त आहेस तू,__नजर लावायला जग उभे राहिले,__नजर काढायला फक्त आहेस तू !_अशा आर्त आणि सार्थ कवितांना भरभरून दाद मिळाली._’मला बघायची आहे
, तुझ्या डोळयातली दरी,__काजळाने माखलेली !_ अशी सादही या कवींनी घातली._”या कैदेतून सुटका नाही_,_विचार कर या मिठीत येण्याआधी_,_लिहिली जाते कहाणी आपली दोनच भागामध्ये_,_मला भेटल्यानंतर, मला भेटण्याआधी “_ अशा ओळीही दाद मिळवून गेल्या.
भारतीय विद्या भवनचे प्रसिद्धी प्रमुख डॉ. दीपक बीडकर यांनी प्रास्ताविक केले हा कार्यक्रम विनामूल्य होता. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १६३ वा कार्यक्रम होता