0.4 लॉकडोऊन महाराष्ट्रात सुरु 31 मे पर्यंत

मुंबई – महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येने 30 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे आता पुढील 14 दिवस राज्यात लॉकडाऊन कायम राहणार आहे. राज्य सरकारकडून याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. देशात 25 मार्चपासून पहिला लॉकडाऊनचा टप्पा सुरु झाला. 21 दिवसांचा हा पहिला टप्पा 14 एप्रिलला संपला. दुसरा लॉकडाऊन 15 एप्रिल ते 3 मे असा होता. तर तिसरा लॉकडाऊन 3 मे रोजी सुरु होऊन 17 मेपर्यंत आहे. 17 मेनंतर चौथ्या लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्याने आढावा घेऊन सूचना द्याव्या, असे पंतप्रधानांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले होते.

Latest News