युपी पोलिसांनी लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवली- शरद पवार

मुंबई | उत्तर प्रदेशमधील हाथरसमधील बलात्कार पीडित युवतीच्या कुटुंबियांना काँग्रेस नेते राहुल गांधी भेट घेण्यासाठी चालले होते. मात्र युपी पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की करत अटक केली आहे. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधींसोबत केलेले वर्तन हे अत्यंत निंदनीय आहे. अशा पद्धतीने लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. कायदा हातात घेतला जात असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांना धक्कबुक्की आणि अटक झाल्यामुळे सर्व राज्यातील काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे.

Latest News