वीज बिल कमी केलं नाही तर उपोषणाला बसू

नवी मुंबई | लॉकडाऊन काळात अनेकांना अव्वाच्या सव्वा वीजबिल आल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्यात. याविषयी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पावित्रा घेतलाय. मनसेच्या महिला सेनेच्या कार्यकर्त्यांनी यासंदर्भात राज्य सरकारला निवेदन दिलंय. या निवेदनात मनसेच्या महिला कार्यकर्त्यांकडून राज्य सरकारला 15 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.

जर येत्या 15 दिवसात वीज बिल कमी केलं नाही, तर नवी मुंबई मनसे महिला शहर अध्यक्षा डॉ. आरती धुमाळ या आमरण करु असा इशारा देण्यात आला आहे.

Latest News