सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत

udhav8

मुंबई | कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी सूर्य-चंद्र असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहील, अशी अरेरावीची भाषा आज करीत आहेत. यावर शिवसेनेने लक्ष्मण सवदी यांना त्यांनी एक लक्षात घ्यावे सूर्य-चंद्र महाराष्ट्रासही तेजाने प्रकाशमान करतील. आचार्य आत्रे यांच्या भाषेत सांगायचे तर “सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत”, याद राखा! असं म्हणत अग्रलेखातून टोला लगावला आहे.

सूर्य-चंद्राच्या साक्षीने कर्नाटकातून तुमची अरेवारी नष्ट होईल व मराठी बांधवांचा लढा यशस्वी होईल, असा विश्वास शिवसेनेने अग्रलेखात व्यक्त केला आहे. तसेच महाराष्ट्राची बांधिलकी बेळगावसह संपूर्ण सीमा बांधवांशी आहे. सीमाप्रश्नी 69 हुतात्मे देणारा शिवसेना हाच एकमेव पक्ष आहे.

सीमा प्रश्नासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रदीर्घ तुरुंगवास भोगला आहे. लोकशाहीत 20 लाख लोकांच्या भावनेस किंमत नसेल तर तुमच्या त्या लोकशाहीची गरज काय?, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकचे व्यक्तिगत भांडण असण्याचं कारण नाही. एक बेळगावचा वाद सोडला तर दोन राज्यातील सामाजिक, सांस्कृतिक नाते इतर राज्यांपेक्षा घट्ट आहे. पण कर्नाटक त्यांच्या हद्दीतील मराठी बांधवांशी निर्घृणपणे वागत आहे, तो प्रकार संतापजनक असल्याचेही शिवसनेने म्हटले आहे.

Latest News