बॅनर्जींचा पराभव केला नाही तर राजकारण सोडून देईन…

mamata-4_647_012816082535_110716050905

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधून विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा सोमवारी सायंकाळी दक्षिण कोलकाता येथे झालेल्या जाहीर सभेत शुभेंदु अधिकारी बोलत होते. यावेळी टीएमसी ही पार्टी नसून खासगी लिमिटेड कंपनी आहे, असे शुभेंदु अधिकारी म्हणाले. याचबरोबर, ममता बॅनर्जींच्या राजकीय कौशल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जर तृणमूल काँग्रेसला बिहारमधून निवडणूक रणनीतिकार (प्रशांत किशोर) नियुक्त करण्याची गरज भासली असेल तर यामुळे हे सिद्ध होते की, राज्यात भाजपाची वाढ होत आहे, असे शुभेंदु अधिकारी म्हणाले. याचबरोबर, नंदीग्राममधून ममता बॅनर्जी यांच्या निवडणूक लढण्याची घोषणा केल्यानंतर शुभेंदू अधिकारी यांनीही जाहीर केले की, ममता बॅनर्जींचा पराभव केला नाही, तर राजकारण सोडून देईन. ते म्हणाले, “जर नंदीग्राममध्ये मी त्यांना (ममता बॅनर्जी) दीड लाखाहून अधिक मतांनी हरवले नाही तर मी राजकारण सोडून देईन.” दरम्यान, ममता बॅनर्जी यांना भवानीपुरमधून जिंकू येऊ, असा विश्वास नाही. त्यामुळे त्या नंदीग्राममध्ये निवडणूक लढण्याचा प्रयत्न करीत आहेत. टीएमसीचे मंत्री सुरक्षित जागांचा शोध घेत आहेत. मात्र, ते कोठे जातात, यामुळे काही फरक पडत नाही, त्यांना काहीही मिळणार नाही, असे पश्चिम बंगालमधील भाजपा अध्यक्ष दिलीप घोष म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले आहे.

Latest News