रिक्षा चालकाने भाडे नाकारल्यास, रिक्षा कायदयानुसार सेक्शन 68 नुसार करवाई

पुणे:: प्रवाश्यांना अश्याप्रकारे रिक्षा चालकाने भाडे नाकारल्यास त्यांनी स्वतः पुढे येत तक्रार केली पाहिजे यासाठी आरटीओच्या संकेत स्थळावर जात ही तक्रार प्रवाश्याना नोंदवता येणार आहे. याबरोबरच आरटीओ कार्यालयात जात लेखी स्वरूपातहीतक्रार नोंदवता येणार आहे.अनेकदा प्रवास करताना जवळचे भाडे असेल तर रिक्षा चालक नकार देत निघून जातात. जवळचे भाडे परवडत नसल्याचे सांगत थेट नाही म्हणतात. अश्या प्रकारे गैरसोय झाल्याचा अनेकांना अनुभव आला आहे.

मात्र अश्या प्रकारे रिक्षावाल्यांनी प्रवास नाकारल्यास त्या रिक्षा चालकाची थेट मोटार वाहन कायद्यानुसार तक्रार करत येते.मात्र यासाठी त्या प्रवाश्याला रिक्षा चालकाची तक्रार द्यावी लागणार आहे. या प्रकारची तक्रार दिल्यानंतर आरटीओ प्रशासन रिक्षा चालकाचा परवाना व परमिट निलंबित करू शकतात. रिक्षा चालकावर मोटार वाहन कायदयानुसार सेक्शन ८६ नुसार करवाई होऊ शकते

. रिक्षा परवाना ३० दिवसांसाठी तर परमिट १० ते ४० दिवसांपर्यंत निलंबित केले जाऊ शकते.शहरातील वेगवेगळ्या भागात शेअर रिक्षा चालल्या जातात . यामध्ये स्वारगेट -कात्रज, स्वारगेट- रेल्वेस्टेशन, वडगाव बुद्रुक ते स्वारगेट, रेल्वे स्टेशन ते हडपसर या भागात सर्वाधिक शेअर रिक्षा चालवल्या जातात. मात्र अनेकदा प्रवाश्यानाकडून पीएमपीएमएलच्या दरापेक्षा अधिक भाडेवाढ आकारली जाते. वाहतुकीचे नियमही पायदळी तुडवले जातात. इतकच नव्हेतर अधिक वेगाने रिक्षा चालवल्यामुळे छोटे-मोठे

अपघातही घडतात.एखादा रिक्षा चालक भाडे नाकारता असले तर ते चुकीचं आहे. तसेच ते वाहन कायदयाचा नियम भंग करणारे आहे. त्यामुळे अश्या रिक्षाचालकांच्या विरोधात तक्रार आल्यास त्यांच्यावर कारवाई ही केली जाणार आहे. अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल शिंदे यांनी दिली आहे.

Latest News