मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर मग सरकार कोसळेल- उल्हास बापट


मुंबई | (. ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -). शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यापैकी शिवाजी पार्क मैदानावर कोण दसरा मेळावा घेणार याचा फैसला काल उच्च न्याय लायाने उद्धव ठाकरेंच्या बाजूने दिला. यानंतर राज्यभर शिवसैनिकांनी जल्लोष करायला सुरुवात केली. आता 27 तारखेकडे होणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावर उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिलीये.घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी शिंदे सरकारबाबत मोठं वक्तव्य केलं. 16 आमदार अपात्र व्हायला हवेत. यामध्ये आमदारांच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही नाव आहे. जर ते अपात्र झाले तर मग सरकारचं कोसळेल, असं उल्हास बापट म्हणालेत
. उच्च न्यायालयाने दसरा मेळाव्याबाबत दिलेला निर्णय कायद्याला धरून असल्याचं देखील बापट यांनी यावेळी सांगितलं दरम्यान, जर शिंदे गटानं कोर्टात जरी याचिका दाखल केली तरी हायकोर्टाचं निरीक्षण नोंदवलं जातं. कधीकधी हायकोर्टाचे निर्णय सुप्रीम कोर्ट फिरवतं मात्र कालचा निर्णय घटनेला धरून आहे, असंही बापट यांनी यावेळी स्पष्ट केलं.
.