महापुरुषांचा अवमान करण्याचे धाडस हे सत्तेची गुर्मी चढल्याने : नाना पटोले


मुंबई
( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) महापुरुषांचा अपमान करणे, त्यांची बदनामी करणे यात भारतीय जनता पक्षाला काहीच वाटत नाही. राजरोसपणे अशी अपमान करणारी वक्तव्यं होत असताना या विधानांचा तीव्र शब्दात निषेध करून कारवाई करणं अपेक्षित होतं. पण भारतीय जनता पक्षानं तसं काहीही केलं नाही. उलट सारवासारव करण्यात आली नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सुधांशु त्रिवेदी. पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रसाद लाड यांनी शिवाजी महाराजांचा अवमान केला. आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे. यामध्ये एक समान धागा असून हे सर्वजण भाजपाचेच असून हा नीतिमत्ता नसलेला पक्ष झाला आहे.
महापुरुषांचा अवमान करण्याचे धाडस हे सत्तेची गुर्मी चढल्याने असून महाराष्ट्राची जनता आपल्या दैवताचा अपमान कदापि सहन करणार नाही व या बेताल लोकांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा हल्लाबोल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी यावेळी केला.:
भाजपासह शिंदे गटातील नेतेमंडळींमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी वक्तव्ये करण्याची चढाओढच लागलेली आहे. हे प्रकार अनवाधानाने झालेले नसून भाजपाकडून शिवाजी महाराज यांची बदनामी करण्याचं जाणीवपूर्वक रचलेलं षडयंत्र आहे असा हल्लाबोल असा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यानी केला आहे