खंडाळ्यात केमिकल टँकरला अपघात…चौघाचा होरपळून बळी

मुंबई-पुणे- ( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना )- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळ्यात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या केमिकल टँकरला झालेल्या अपघातात आगीचा भडका उडाल्याने चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. या घटनेत परिसरही आगीने वेढला असून अनेक वाहने आगीत भस्मसात झाली आहे. आज (मंगळवारी) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली

द्रुतगती मार्गावर आगीचे लोट पसरल्याने पुण्या मुंबई दरम्यानची तसेच कुणेगावकडे जाणारी वाहतूक विस्कळित झाली आहे. टँकर ने पेट घेतल्यानंतर आगीचे काही लोट पुलावरून खाली पडले यावेळी कुणेगाव पुलाखालील काही वाहने जळाली असून एका दिवसाची व रागेचा लोट पडल्याने चौघांचा बळी गेल्याची भीती व्यक्त होत आहे.

आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे.

Latest News