आम्ही अशावेळी उमेदवार देऊ की त्यांना कळणारही नाही बारामती कशी गेली- चंद्रशेखर बावनकुळे


Pune: ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
भाजपने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राज्यभरात पदाधिकारी कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. बारामती लोकसभेसाठी भाजपचं गणित काय आहे, तिथे भाजपने कशी तयारी केली आयांच्या ताकदीचा, त्यांच्या विरोधात लढणारा उमेदवार भाजपला अजून मिळाला आहे की नाही, या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले, ”आम्ही अशावेळी उमेदवार देऊ की त्यांना कळणारही नाही बारामती कशी गेली.
आमचा पक्ष वाढवण्यासाठी, आमचा उमेदवार निवडून येण्यासाठी आम्ही रणनीती आखत आहोत. पण शेवटी जनतेचा निर्णय आहे, त्यांनी सुप्रिया सुळेंना निवडून द्यायचं की भाजपच्या उमेदवाराला निवडून द्यायचं हा शेवटी जनतेचा निर्णय आहे. जर अमेठी जाऊ शकते तर बारामतीही जाऊ शकते. शेवटी तिथे त्यांचा पक्ष मजबूत आहे पण आम्हीही प्रयत्न करत आहोत. ज्या पद्धतीने आम्ही काम करतो. ज्या पद्धतीने चक्र फिरणार आहेत ते पाहता आम्ही बारामतीही जिंकू असा आमचा विश्वास आहे. बारामती लोकसभा मतदार संघात आम्ही यावेळी असा उमेदवार देऊ की त्यांना कळणारही नाही बारामती कशी गेली”.असं सूचक विधान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.
हा संस्कृती, मर्यादा पाळणारा पक्ष आहे पण भाजपमधील काही नेतेमंडळीच भाजपच्या संस्कृतीत न बसणारी वक्तव्ये करतात. त्यावेळी तुमच्या आणि इतर राजकीय पक्षातील नेत्यांना तुम्ही काय सल्ला द्याल. या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले, पक्षावर टिका होऊ शकते पण व्यक्तिगत टिका होऊ नये पण आता ती व्हायला लागली आहे. ती संपली पाहिजे, भाजपच्याही कार्यकर्त्यांनाही आम्ही सूचना दिल्या आहेत की व्यक्तीगत टिकाटिपण्णीवर जाऊ नये, धोरणावर बोला. पक्षावर टिका करा पण व्यक्तीगत टिका करु नका, अशा सूचना मी त्यांना दिल्या