कोरेगाव पार्क मध्ये जो अपघात झाला तो दुर्दैवीच : वसंत मोरे

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
कोरेगाव पार्क मध्ये जो अपघात झाला तो दुर्दैवीच होता…, पण त्यामागून जे राजकारण चालू दिसतंय त्यामध्ये आपल्या पुण्याच्या काही नेत्यांची कीव येते…, नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्क मध्येच आहे का? ज्यांनी पुढाकार घेऊन कारवाया लावल्या त्या कोथरूड मधील पुढाऱ्यांनी जरा आपल्या भागातील नाईट लाईफ विषयी लक्ष द्यावे,
सोबतच भुगाव, पिरंगुट या भागाकडे म्हणजेच मुळशी कडेही लक्ष द्यावे,तसेच ज्यांनी निवेदन दिली त्यांनी सुद्धा एन आय बी एम कोंढवा भागाकडे सुद्धा लक्ष द्यावे,
नाहीतर असं म्हणावं लागेल कोरेगाव पार्कमध्ये जाणारी तरुण पिढी दारू पिण्यासाठी जाते आणिवरील भागांमध्ये नाईट लाईफ साठी जाणारी तरुण पिढी नारळाचे पाणी पिण्यासाठी जाते का ?कोणकोणत्या नेत्याचे कुठे कुठे नाईट लाईफ मध्ये लागेबांधे आहेत भविष्यातजर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर जागेवर जाऊन लाईव्ह केले जातील…पोलीस यंत्रणेने फक्त कोरेगाव पार्क टारगेट न करता संपूर्ण पुणे शहर सुद्धा टार्गेट करावे…अन्यथा वंचित बहुजन आघाडी म्हणून जर कुठे हिंसक आंदोलन झालीतर त्याला संपूर्णपणे जबाबदार ही भ्रष्ट यंत्रणा असेल…,
कल्याणी नगर अपघात प्रकरणावरुन राज्यातील राजकीय राजकारण तापले आहे. त्यातच पुण्यातील महाविकास आघाडीचे नेते रवींद्र धंगेकर आणि महायुतीचे नेते मुरलीधर मोहोळ ) यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत
. यामध्ये आता वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंत मोरे यांनी यामध्ये उडी घेतली आहे. कोरेगाव पार्क मध्ये जो अपघात झाला तो दुर्दैवीच होता…, नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्क मध्येच आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.
अपघातानंतर अल्पवयीन आरोपीला काही अटींच्या आधारे काही तासात मंजूर केला होता. यावर प्रचंड रोष व्यक्त झाला होता. अशातच आता पोलिसांनी अल्पवयीन आरोपीवर वाहन कायद्याच्या कलम 185 अंतर्गत नव्याने गुन्हा दाखल केला आणि पुन्हा एकदा त्याला न्यायालयात हजर केले
