अजित पवारांचा ताबडतोब राजीनामा घ्या : अंजली दमानीया

anjali

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- पुणे अपघात प्रकरणात सुनील टिंगरे यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या विनिता देशमुख यांनी केला होता. त्याानंतर हे प्रकरण दाबण्यात आल्याची चर्चा सुरू झाली.  अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. तर सुनिल टिंगरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. अजित पवारांनी पोलिस आयुक्तांना फोन करून मंगळवारी दुपारी कारवाईचे आदेश दिले.

सुनील टिंगरे हे मध्यरात्री येरवडा पोलीस स्टेशनमध्ये होते, त्यांनी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप होत आहे. पुण्याच्या आयुक्तांनी अजित पवारांचा फोन आला होता तर त्यांनी तात्काळ स्पष्टीकरण द्यावे. फोन केला की नाही?  फोन केला नसेल तर उत्तम पण केला असेल तर अजित पवारांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा. मु्ख्यमंत्र्यांनी आज अजित पवारांकडे राजीनाम्याची मागणी करावी.

फडणवीसांनी सुद्धा अजित पवारांकडे राजीनाम्याची मागणी करावी, अशी मागणी अंजली दमानीया यांनी केली आहे. अजित पवारांनी पोलिसांना फोन केला होता का? असा सवाल  सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी पोलिसांना केला आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी दमानियांनी केली आहे.

‘फोन केला असेल तर अजित पवारांचा मुख्यमंत्री राजीनामा घेतील का?’, असा सवाल दमानिया यांनी केला आहे.