उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाजातील सर्व आरक्षण संपवण्याचा डाव; राज राजापूरकर

आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका संशयास्पद- राज राजापूरकर
देवेंद्र फडणवीस यांना समाजातील आरक्षण संपवण्याचा डाव; राज राजापूर कर

पिंपरी ( ऑनलाईन न्यूज (परिवर्तनाचा सामना )

राज्य सरकारमधील मंत्री तथा सरकारमधील नेत्यांच्या वतीने मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा विषय ज्याप्रमाणे हाताळत आहे. या संदर्भातील सरकारची भूमिका संशयास्पद असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना समाजातील आरक्षण संपविण्याचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल चे अध्यक्ष राज राजापूरकर यांनी पिपंरी येतील आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पार्लमेंटरी बोर्ड सदस्य लथा ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर म्हणाले की, राज्यात एकीकडे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन सुरु होते. त्यांनतर आता ओबीसीतून आरक्षण मिळू नये म्हणून आंदोलन केले जात आहे. हे आदोलन सांभाळताना सत्तेतील लोक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

. सरकारने नोंदी शोधल्या, प्रमाणपत्र दिले, पण मला यात संशय येतो आहे. ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी सरकारची भुमिका संशयास्पद आहे. कारण ते जातनिहाय जनगणना करत नाही. जालनिहाय जनगणना संदर्भात आम्ही वारंवार भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र सरकारच्या वतीने जातनिहाय जनगणना करण्यावर सरकारकडून कुठलीही भूमिका स्पष्ट करण्यात येत नाही आहे.

आम्ही जातनिहाय जनगणना व्हावी म्हणून आंदोलन करणार आहोत. जातीनिहाय जनगणनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आम्ही राज्याल ठीक ठिकाणी आंदोलन करणार आहे. तसेच अधिवेशना दरम्यान राज्य सरकारला विधानसभेवर जाऊन घेरावा देखील घालण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे

ओबीसी आमचा डीएनए आहे असे म्हणणाऱ्या फडणवीस यांच्या वक्तव्याचा ओबीसी सेलच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो. कारण जैव्हा ओबीसी आरक्षणाविषयी भुमिका घेण्याचा मुद्दा येतो तेंव्हा आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीस नेहमीच वेळेनुसार वेगवेगळे वक्तव्य करत असतात.

Latest News