बदलापूर प्रकरणावरुन लाठीचार्ज करणे चुकीचे – प्रकाश आंबेडकर

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- देशात हेटरेटमुळे समाज गुन्हेगारी करायला लागला आहे. त्याचेच हे परिणाम आहे, संस्था स्वतः देश आणि पॉलिटिकल पार्टी यांनी संयम आणि शांतता करायला पाहिजे. दुर्दैवाने आरएसएस बजरंग दल आणि भाजप तिन्ही पक्ष वायलंसचा प्रसार करत आहे.  आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्यावर सुरक्षा करणे हे पोलिसांचा काम आहे. पण आंदोलकांना शांत कस करायच हे ही पोलीसांच काम आहे. लोकांसोबत व्यवस्थित डायलॉग झाला असता तर हे शांतता राहिली असती. या सगळ्याचा अभाव या ठिकाणी दिसून आला. म्हणून लाठीचार्ज झाला, असंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.  कुठल्या विषयावर लाथीचार्ज करावा आणि कुठं करू नये यावर शासनाने  नियम केला पाहिजे. लोक अत्याचाराविरोधात आंदोलन करत होते, रेल्वे बंद झाल्यामुळे लोकांना त्रास झाला, पण अशा संवेदनशील विषयावर पोलिसांनी लाठीचार्ज आणि शासनाने लाठीचार्ज करायला सांगणे या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहे. शासन आणि पोलीसांचा निषेध करतो”, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले. बदलापूर येथील आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याप्रकरणी त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

Latest News