जिल्ह्यातील सर्व जुने व जीर्ण झालेले पूल, साकव दुरुस्ती करण्याऐवजी काढूनच टाकण्याचे आदेश- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे:  (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)

कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जूना पूल कोसळल्याची घटना घडल्यावर याची गंभीर दखल घेत, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्यातील सर्व जुने व जीर्ण झालेले पूल,साकव दुरुस्ती करण्याऐवजी काढूनच टाकण्याचे आदेश जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. जिल्हाधिकारी डुडी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले

ही घटना घडण्यापूर्वीच आठ दिवस अगोदर जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना जिल्ह्यातील जुन्या व जीर्ण झालेल्या साकव पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार या दोन्ही यंत्रणांनी ऑडिटचे काम करून त्या ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आले पण ही घटना या दरम्यानच घडली.

त्यामुळे आता जिल्ह्यातील जीर्ण साकव ( दोन गावांना नदीवरून जोडणारा छोटा पूल), धोकादायक पूल पूर्णपणे काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सदर घटनेची सूक्ष्म चौकशी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली आहे.

या चौकशी समितीचा अहवाल पंधरा दिवसांत आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अशा घटना भविष्यात घडू नये म्हणून जी एस ओ पी ( प्रमाणित कार्य पद्धती) तयार केली आहे

त्यात काही बदल करन्याबाबत ही समिती काम करणार आहे. या समितीत उप वन संरक्षक, पोलीस उपायुक्त पिंपरी चिंचवड, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे मंडळ व निवासी जिल्हाधिकारी राहणार आहेत

.कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील साकव पूल कोणाचा व तो कोणी बांधला याबाबत आता तू तू मै मै सुरू झाली आहे. हा पूल जिल्हा परिषद यांनी बांधला असल्याचे समोर आले आहे. पण जिल्हा परिषद आम्ही हा पूल बांधला नसल्याचे सांगत आहे. व ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोट करत आहे. मात्र आता जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालात हा पूल कोणी बांधला हे स्पस्ट होणार असून, त्यानंतर संबंधित यंत्रणेवर कारवाई होणार आहे.

दरम्यान आठच दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद यांना जिल्ह्यातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार संबंधित यंत्रणांनी तेथे बॅरिकेटिंग केले होते. परंतु अद्याप हा एकत्र अहवाल आला नसल्याने जिल्ह्यात असे किती धोकादायक पूल आहेत हे अंधारात आहे.मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहराजवळील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जूना पूल रविवारी दुपारी कोसळून यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला तर ५१ जण नदीत पडले होते

. अवघ्या अर्ध्या तासात या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पोहचल्याने या सर्वांना वाचविण्यात यश आले. या ठिकाणी हा पूल धोकादायक आहे असा फलक लावून बॅरिकेटिंग करून तो बँद केला होता. पण उत्साही पर्यटक यांनी त्याच्यावर एकाच वेळी गर्दी केल्याने तो कोसळला.

Latest News