बीड जिल्ह्यात मातंग समाजाच्या तरुणाचा सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यास समाजकंटकांचा विरोध: तात्काळ गुन्हे दाखला करण्याची मागणी


पुणे -(ऑनलाईन न्यूज परिवर्तनाचा सामना )
उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना- गेवराई तालुक्यात सार्वजनिक स्मशानभूमीत मातंग समाजातील तरुणांच्या अंत्यविधी करण्यास काही समाजकंटकांचा विरोध केला आहे या घटनेचा जाहीर निषेध करून त्याच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी शिवशाही व्यापारी संघाचे अध्यक्ष युवराज दाखले यांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे
केले:- युवराज दाखले गेवराई तालुक्यातील सिंदखेड गावात सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कारास काही समाज कंटकांनी विरोध केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मातंग समाजातील रामभाऊ दिनकर धुरंधरे यांचं निधन झालं. पण त्यांच्या अंत्यविधीसाठी नातेवाईकांना गावात सार्वजनिक स्मशान भूमित विरोध करण्यात आला.
या निंदनीय कृत्याचा शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. गावात स्वतंत्र स्मशानभूमीची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने करित आहे.
दरम्यान पोलीस प्रशासनाने गावामध्ये दाखल झाल्यानंतर तब्बल सात तासानंतर गायरान जमीन परिसरात अंत्यविधी करण्यात आला.तसेच या प्रकरणात विरोध करणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना इमेल द्वारा केली आहे.