मोदींनीही आक्रमक होऊन चीनला धडा शिकवला पाहिजे- जितेंद्र आव्हाड

मुंबई | चीनने भारताच्या भूमीत घुसून आपल्या सैनिकांना मारलं असून चीनला धडा शिकवायला पाहिजे, असं राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

चीनने भारताच्या भूमीत घुसून आपल्या सैनिकांना मारलं आहे. अशावेळी चीनला धडा शिकवला पाहिजे. मोदींसोबत संपूर्ण देश आहे. आता मोदींनीही आक्रमक होऊन चीनला धडा शिकवला पाहिजे. झोपाळ्यावर बसून झालं. आता चीनकडे ‘लाल आंखे’ करून पहायची वेळ आली आहे, असंही आव्हाड म्हणाले आहेत.

भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाल्याचं वृत्त आल्यानंतर सुरुवातीला भारताचे तीन जवान शहीद झाल्याची माहिती आली होती. त्यावेळी आव्हाड यांनी हे ट्विट केलय.

दरम्यान, लहानसहान गोष्टींवर ट्विट करणारे पंतप्रधान शहीद जवानांबद्दल चकार शब्दही काढायला तयार नाहीत! पंतप्रधानांच्या मौनव्रताने वर्तमान प्रश्न सुटणार नाही, असं ट्विट करत महाराष्ट्र काँग्रेसने मोदींवर निशाणा साधला आहे.

Latest News