योगीजी निर्भया प्रकरणानंतर दिल्लीचं तख्त बदललं होतं- छगन भुजबळ


नाशिक | निर्भया प्रकरणानंतर दिल्लीचं तख्त बदललं होतं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे विसरू नये, असं राष्ट्रवादीचे नेते, अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीनंतर देशात लोकशाही आहे की नाही असा प्रश्न पडला आहे, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. उद्या 2 ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधी यांची जयंती आणि गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला राहुल गांधींना धक्काबुक्की तसंच त्यांच्यावर लाठीचार्ज होणं हे निंदनीय आहे, असं भुजबळ म्हणाले.