या तिघांनाच आम्ही राजे मानतो – प्रकाश आंबेडकर

मुंबई | राजे सम्राट अशोक,छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या तिघांनाच आम्ही राजे मानतो, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. वंचित बहुजन आघाडीने घेतलेली भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजूची आहे. पुतळे जाळा, काहीही केले तरी आम्ही आमची भूमिका व पक्षाची भूमिका बदलणार नाहीत. ही भूमिका वैचारिक आहे,आणि ती कायम राहील, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, एक राजा तर बिनडोक आहे, या वक्तव्याने प्रकाश आंबेडकरांवर टीका होत आहे. मात्र पुन्हा एकदा आंबोडकरांनी ट्विट करत आपण तीन राजे सोडून इतर राजेंना मानत नसल्याचं म्हटलं आहे.

Latest News