देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे चालली

सोलापूर | देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे चालली आहे. देशात बेबंदशाहीची स्थिती येईल, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मोदी सरकारवर केली आहे. मोदी सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था बिकट झाली आहे. ती सातत्याने ढासळत आहे. सामाजिक शांतता राहिली नाही. महिलांवर अत्याचार वाढत आहेत. अशा या परिस्थितीत बेबंदशाही वाढू शकते, अशी भीती शिंदे यांनी व्यक्त केलीये. गरीब माणसाला येथे जगणे कठिण झाले आहे. आर्थिक परिस्थिती बिघडली आहे, त्यामुळे नव्या सुशिक्षित तरुणांना काही वाव राहिलेला नाही. त्यामुळे देशातील विस्कटलेल्या सगळ्या पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.

Latest News