भाजप 400 चा आकडा 2024 च्या निवडणुकीत करणार – चंद्रकांत पाटील

modi-11

मुंबई प्रतिनिधी परिवर्तनाचा सामना: संपूर्ण देशाने कृषी कायद्यांचे समर्थन केलं आहे. हे कायदे सहा महिन्यांपूर्वी झाले. मात्र विरोधकांना आता जाग आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकरी हिताचे कायदे केले. त्यामुळेच त्यांना विरोध होत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेले निर्णय पाहता 2024 च्या निवडणुकीत भाजप 400 चा आकडा क्रॉस करणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. कणकवलीमध्ये ते बोलत होते. राज्यातली मूठभर लोकांच्या साथीने देशातीव शेतकऱ्यांचं आंदोलन केलं जात असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर विकण्याचा कायदा काँग्रेसने तीन वेळा आणण्याचा प्रयत्न केला. आता शेतकऱ्यांना फसवले जात असल्याचा आरोप ते करत आहेत असं म्हणत शेतकऱ्यांना वेडे समजता का?

Latest News