अर्थमंत्री अजित पवार यांनी सर्व समावेश अर्थसंकल्प विधानसभेत मांडला….

मुंबई |अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रामध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्रात 11.7 टक्के भरीव वाढ करण्यात आली आहे. तर तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेऊन दिलेल्या वेळेत परत करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज दिलं जाणार आहे. एपीएमसीच्या बळकटीकरणासाठी 2 हजार कोटी रूपयांची योजनेची घोषणा पवारांनी केली आहे.

कृषी पंप जोडणी धोरणामध्ये महावितरणाला 1500 कोटी रूपयांचं निधी भांडवल मिळणार आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्वाचं धोरण म्हणजे विकेल ते पिकेल या धोरणाद्वारे 2100 कोटींची खरेदी राज्य सरकार करणार आहे. तर अमरावती जिल्ह्यातील वरुड आणि मोर्शी तालुक्यांत अत्याधुनिक संत्रे प्रक्रिया स्थापन करण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला

. ठाकरे सरकारने यंदाच्या वर्षी आपला दुसर अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात अजित पवारांनी विविध क्षेत्राला भरीव अशा निधींची तरतूद केली आहे. यातील महत्त्वाचे 10 क्षेत्र ज्याकडे सरकारने बारकाईने पाहत संबंधित क्षेत्रांना निधी दिला आहे. मराठवाडा आणि आसपासच्या भागातील मोसंबी पिकाची गुणवत्ता आणि उत्पादकता वाढवण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणमध्ये 62 एकर जागेवर ‘सिट्रस इस्टेट’ स्थापना करण्यात येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर खाजगी रोपवाटिका योजनेमध्ये भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचा उत्पन्न वाढवण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे.

तर 4 कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी दरवर्षी 200 कोटी प्रमाणे 4 वर्षांत 600 कोटी देणार येेणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. दरम्यान, शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेमध्ये शेतकऱ्यांना शेळी, म्हशी-गाई पालनासाठी पक्का शेड बांधण्यासाठी अनुदान दिलं जाणार आहे. तर मत्स्यव्यवसाय आणि मत्सविभगासाठी साठी 3700 कोटी अर्थसंकल्पातून भेटणार आहेत.

पुण्यातील केलेल्या घोषणांमध्ये सर्वात महत्वाची घोषणा होती ती म्हणजे  पुण्यात आठ पदरी रिंग रोडची उभारणीबाबतची. पुण्यातील रिंगरोड काळाची गरज असल्याचं अजित पवार म्हणाले. त्यासाठी 170 किमी लांबीच्या 26 हजार कोटींच्या आठ पदरी रिंग रोडचं काम करण्यात येणार आहे. या रिंगरोडमुळे पुण्यातील वाहतुक कोंडीची समस्या सुटणार असल्यातं अजित पवारांनी सांगितलं. पुण्यातील केलेल्या या घोषणांमध्ये पुण्यातील ससून रुग्णालयात कार्यरत वर्ग 4 मधील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाच्या बांधकामासाठी 28 कोटी 22 लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता दिल्याचं अजित पवारांनी घोषणा दिली आहे.

शहरात आणखी एक विमानतळ उभारण्यात येणार असल्याचंही अजित पवारांनी सांगितलं आहे. दरम्यान, पुण्यातील बालेवाजी क्रीडा संकुलात विविध प्रकारच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचंही अजित पवारांनी घोषणा केली आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प मांडला. अनेक क्षेत्रांना भरीव निधींची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये कृषी क्षेत्राला आणि आरोग्या विभाग यांचा समावेश आहे. त्यासोबतच सर्वांचं लक्ष लागून होतं ते म्हणजे पुण्याला अर्थसंकल्पातूू काय मिळणार याकडं. पुण्यातील महत्त्वाच्या प्रकल्पासाठीही पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी घोषणा केल्या आहेत.