पुण्यात कडक लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता नाही-महापौर मुरलीधर मोहोळ


पुणे | पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी जी उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे. ती सध्याची असू शकत नाही. कारण गेल्या दोन आठवड्यात परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. राज्य सरकारकडून सध्या आकडेवारीत घोळ सुरू आहे. पुणे शहराबाबत मुंबई उच्च न्यायालयात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जुनी सादर करण्यात आली असावी. पूर्वीसारखी परिस्थिती पुण्यात आता नाही. म्हणूनच या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीती निर्माण होऊ नये, या उद्देशाने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. तसेच पुण्यात आणखी कडक लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता नसल्याचीही आपली भूमिका आहे, अशी महिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे
.त्यांच्याकडून जी आकडे जाहीर केली जात आहे. यामध्ये प्रचंड विसंगती दिसून येत आहे. मात्र मागील पंधरा दिवसात पुणे शहरात चांगली परिस्थिती पाहण्यास मिळत असून सक्रिय रुग्णांची संख्या जवळपास 16 हजारांनी कमी झाली आहे. तर मृत्यूदर देखील तुलनेनं खाली आला आहे,
असंही मोहोळ म्हणाले.पुण्यात 1 लाख आणि मुंबईत 53 हजारांच्या आसपास रुग्णसंख्या असल्याचं पुढं आलं आहे. ही आकडेवारी जिल्ह्याची असेल, असं मला वाटतं. तर शहर, पिंपरी चिंचवड, ग्रामीण अशी मिळून लाखभर संख्या दाखवण्यात आली असावी. पुणे शहराची परिस्थिती नियंत्रणात असून आता सर्व माहिती घेऊन मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं जाणार आहे, असं स्पष्टीकरण मोहोळ यांनी दिलं आहे.
दरम्यान, महापालिकेच्या माध्यमातून पुण्यात 7 ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत आहेत. पुणे शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने, अनेक उपाययोजना केल्या जात आहे. पुणे शहरात जवळपास 39 हजार सक्रीय रुग्ण आहे. हीच संख्या 15 दिवसांपूर्वी 55 हजारांच्या पुढे होती. ही संख्या निर्बंध आणि उपाययोजना यामुळे आटोक्यात आली आहे