मोदीसरकार गप्प का? ”देश तुमच्यासोबत आहे”

मुंबई – भारत-चीन सीमेवर एकही गोळी न झाडता आपले २० सैन्य शहीद होतात. मात्र यावर मोदीसरकार गप्प आहे. त्यामुळे शिवसेनेने केंद्राला जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. आपले जवान शहीद झाल्यानंतर आपण काय केलं? असा सवाल राऊतांनी ट्विटरद्वारे विचारला आहे. तसंच, आपण करारा जवाब कधी देणार, असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.

राऊत यांनी त्यांच्या खास शैलीत मोदींची स्तुती करत चिमटेही काढले आहेत. चीनच्या अरेरावीला सडेतोड उत्तर दिलं जाईल का? चीनने एकही गोळी चालवली नाही. तरीही आमचे २० जवान शहीद झाले. आपण काय उत्तर दिलं? चीनचे किती सैनिक मारले? चीन आपल्या भूप्रदेशात घुसला आहे का? पंतप्रधानजी, या संकटाच्या काळात देश तुमच्या सोबत आहे, पण सत्य काय आहे ते सांगा? काही तरी बोला. देशाला सत्य जाणून घ्यायचंय, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे. मोदीजी, तुम्ही शूर आणि योद्धे आहात. तुमच्या नेतृत्वात देश चीनचा बदला घेईल का? असा सवालही त्यांनी केला आहे.

Latest News